16.4 C
New York
Sunday, June 15, 2025

Buy now

spot_img

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले – मूग, उडीद, भुईमुगाच्या शेतात पाणीच पाणी!” गौंडाळा (ता. मेहकर) परिसरात मुसळधार पावसाने उन्हाळी पिकांची वाट लावली; आमदार सिद्धार्थ खरात यांनी केला शेतातील थेट दौरा – तातडीच्या पंचनाम्यांचे प्रशासनाला आदेश!

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले – मूग, उडीद, भुईमुगाच्या शेतात पाणीच पाणी!”

गौंडाळा (ता. मेहकर) परिसरात मुसळधार पावसाने उन्हाळी पिकांची वाट लावली; आमदार सिद्धार्थ खरात यांनी केला शेतातील थेट दौरा – तातडीच्या पंचनाम्यांचे प्रशासनाला आदेश!

मेहकर (प्रतिनिधी):

मेहकर तालुक्यातील गौंडाळा गावात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आशा, मेहनत आणि गुंतवणुकीवर अक्षरशः पाणी फेरलं. गेल्या काही दिवसांपासून उन्हाळी हंगामासाठी जोमाने उभारी घेतलेल्या मुग, उडीद, भुईमुग आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिकांच्या मुळाशीच पाणी साचल्याने अनेक शेतकरी उध्वस्त झाले आहेत.

या गंभीर परिस्थितीत आमदार सिद्धार्थ खरात यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी महसूल प्रशासनाला “तातडीने पंचनामे करा, आणि शेतकऱ्यांना त्वरेने मदत द्या” अशा शब्दांत खडसावले.

“पिकांवर पाणी, डोक्यावर कर्ज – आता कोण वाचवणार?” शेतकऱ्यांचा आक्रोश

“बियाणं, खत, मजूरी, औषधं – सर्वकाही उधारीवर घेतलं, आता सगळं पाणीपाण झालं!”
अशा असंख्य शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू आणि मनात भीती आहे. अनेकांनी शेतीसाठी घेतलेली कर्जं आता फेडायची कशी, असा प्रश्न त्यांना सतावत आहे.

पाहणी दौऱ्यात प्रशासनासोबत आमदारांचा ‘सवाल-जवाब’

या पाहणी दौऱ्यात आमदार खरात यांच्यासोबत ऍड. आकाश घोडे (युवासेना तालुका प्रमुख), सरपंच गजानन जाधव,डॉ सार्थ सिद्धार्थ खरात, मेहकर शहर अध्यक्ष किशोरभाऊ गारोळे,मंडळ अधिकारी, तलाठी, आणि गावातील शेकडो शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी आपली व्यथा स्पष्ट शब्दांत मांडली, तर आमदारांनीही प्रशासनाकडे तत्काळ कारवाईसाठी ठोस सूचना दिल्या.

“हा केवळ नैसर्गिक नाही, तर प्रशासनिक कसोटीचाही काळ!” – सिद्धार्थ खरात

“शेतकऱ्यांचं दु:ख समजून घेणं ही फक्त सहानुभूती नव्हे, ती माझी जबाबदारी आहे,” असे आमदार खरात यांनी ठामपणे सांगितले. “पंचनामे कागदावर नको, जमिनीवर हवे!”

अवकाळी पावसाने निर्माण केलेली ही नैसर्गिक आपत्ती आता प्रशासनाची परीक्षाही ठरणार आहे. आमदार खरात यांचे तातडीचे आदेश आल्याने प्रशासन खडबडून जागे झाले असून , शेतकऱ्यांना मदत शेतकऱ्यांच्या नुकसानीची मदत आणि न्याय मिळावा अशी अपेक्षा शेतकरी वर्ग करत आहेत

Related Articles

ताज्या बातम्या