*वादळी पावसाने नुकसान झालेल्या शेती पिकाचे त्वरित पंचनामे करण्यात यावे. स्वराज्य पक्षाची मागणी.*
*गोपाल तायडे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली पाहणी.*
——————————————–
शेगाव: प्रतिनिधी.
तालुक्यात माघील तीन दिवसा पासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होत आहे. अक्षरशः पूरग्रस्त परिस्तिथी उद्भवलेली आहे.अचानक आलेल्या या पावसाने शेतकऱ्यांचे कंबर्डे मोडले सलग तीन चार दिवसांपासून तालुक्यात वादळीवाऱ्यासह पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. अवकाळी पावसामुळे कांदा,ज्वारी,माका. उन्हाळी पिकाचे चागेलच नुकसान झाले आहे. या
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच पेरणी पूर्व मशागतीवर देखील परिणाम झाला आहे. शेतकऱ्याच शेती मशागती थांबली आहे.
अवकाळी पावसणे शेतकऱ्यांचे हाता तोंडाला आलेलं पीक हिसकावून घेतलेल आहे. शेतकऱ्यांच शेती पीक अक्षरशा भुईसपाट झाले आहे.त्या मुळे स्वराज्य पक्षाचे नेते गोपाल तायडे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच झालेल्या शेती पिकची पाहणी करून कृषी अधिकाऱ्याशी संपर्क केला. शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरीव अशी मदत शेतकऱ्यांना करण्यात यावी अशी मागणी केली गोपाल तायडे यांनी केली असून अन्यथा शेतकऱ्यांच्या न्याय हक्का करिता रत्यावर उतरू असा इशाराही प्रसार मध्यमाशी बोलताना कृषी विभागाला त्याच्या कडून देण्यात आला आहे दिला आहे.