शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चात सहभागी होण्याचे डॉ. गोपाल बछिरे यांचे आवाहन , 2 मे ला जिल्हाधिकारी कार्याल्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने भव्य मोर्चा आयोजन..
- सातबारा कोरा, विज बिल शून्य, पिक विमा त्वरित मिळण्याकरिता शिवसेना उबाठा चे आमदार सिद्धार्थ खरात, जिल्हासंपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, शिवसेना प्रवक्त्या जयश्रीताई शेळके यांच्या नेतृत्वात दि. २ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा धडकणार आहे, करिता हजारोच्या संख्येने शेतकरी बांधवांनी आपले ट्रॅक्टर घेऊन उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे हे गावोगावी कॉर्नर बैठका घेऊन करीत आहे
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मा. देवेंद्र फडणवीस, मा. अजित पवार, मा. एकनाथ शिंदे यांनी आपल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून त्यांचा सातबारा कोरा करू, शेतीचे वीज बिल शून्य करू १००% पीक विमा देऊ, लाडक्या बहिणींना २१०० रुपये देऊ असे अभिवचन दिले होते लोकांनी भरभरून मतदान दिले, महायुतीचे सरकार आले सरकार येताच त्यांनी आपले वचन मोडले व शेतकऱ्यांना ३१ मार्च च्या आत कर्ज भरण्याची ताकीद दिली, विज बिल न भरल्यास वीज प्रवाह कापण्यात येईल असा सज्जड दम दिला, पिक विमा पूर्ण न देता १००, ५०० रुपये देऊन शेतकऱ्यांची थट्टा करण्यात येत आहे, लाडक्या बहिणींना २१०० देण्याच्या ऐवजी ५०० रुपयांवर बोळवण करण्यात येत आहे याच्या विरोधात मेहकर लोणार विधानसभेचे आमदार सिद्धार्थ खरात, जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, शिवसेना प्रवक्त्या जयश्रीताई शेळके यांच्या नेतृत्वात दिनांक २ मे रोजी सकाळी ११ वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती ते जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा विराट ट्रॅक्टर मोर्चा धडकणार आहे या मोर्चात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हजारोच्या संख्येने आपले ट्रॅक्टर घेऊन उपस्थित राहावे याकरिता जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछीरे शहर प्रमुख गजानन जाधव उपशहर प्रमुख लुकमान कुरेशी, सुदन अंभोरे, विनायक मापारी हे गावोगावी जाऊन कॉलर बैठका घेऊन शेतकऱ्यांना या मोर्चाची माहिती देऊन त्यांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करीत आहेत