15.7 C
New York
Monday, June 16, 2025

Buy now

spot_img

मागील त्याला कर्जमाफी द्या, आणि मागील त्याला पीक विमा द्या या मागणीसाठी सिंदखेड राजा येथील उपविभागी कार्यालयावर धडकणार मोर्चा.

मागील त्याला कर्जमाफी द्या, आणि मागील त्याला पीक विमा द्या या मागणीसाठी सिंदखेड राजा येथील उपविभागी कार्यालयावर धडकणार मोर्चा.

बुलढाणा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना मागील त्याला कर्जमाफी द्या या मागणीसाठी किसान ब्रिगेड, चे सर्वेसर्वा
श्री प्रकाशभाऊ पोहरे यांच्या नेतृत्वाखाली ”मागेल त्याला गरज त्यालाच कर्जमुक्ती” योजने अंतर्गत कर्जमुक्ती अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे. किसान ब्रिगेड ची संकल्पना ही संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेतकरी योद्धा कृती समिती कृती समिती बुलढाणा जिल्हा प्रत्येक गावामध्ये पोहोचण्याचं काम करीत असून आत्तापर्यंत पळसखेड चक्का, गोदंनखेड, पिंपळगाव लेंडी, किंनगाव राजा, सिंधी, बाळ समुद्र, सिंदखेडराजा, अशा अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांनी कर्जदार शेतकऱ्यांनी आपले कर्जमुक्तीचे अर्ज भरून घेणे सुरू केले असून तसेच असे आवाहन शेतकरी योद्धा कृती समिती बुलढाणा जिल्हा यांनी केले आहे.

तसेच मागील त्याला पिक विमा द्या याही मागणीची फॉर्म संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेतकरी भरून येत आहे दिनांक ५ मे रोजी उपविभागीय कार्यालय सिंदखेड राजा येथे भव्य मोर्चाचे आयोजन शेतकरी योद्धा कृती समितीच्या वतीने केली आहे तसेच

राज्यातील राजकीय पक्षांनी नोव्हेंबर २०२४ च्या निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सहा महिने उलटूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने आणि काही नेत्यांनी कर्ज भरण्याचे आवाहन केल्याने, शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर, लोकनायक शेतकरी नेते प्रकाशभाऊ पोहरे यांनी कर्जमुक्ती आंदोलन सुरू केले असून, राज्यभरातील शेतकऱ्यांकडून कर्जमुक्ती अर्ज भरून घेतले जात आहेत. सिंदखेडराजा
तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी शेतकरी मित्र दिलीप भाऊ चौधरी, शेतकरी योद्धा श्री बालाजी सोसे व गजानन जायभाये कर्जमुक्ती अर्ज भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रकाशभाऊ पोहरे यांनी ही जबाबदारी आमच्याकडे सोपवली आहे. भरलेले अर्ज छत्रपती संभाजी महाराज जयंती दिनी १४ मे रोजी उपविभागी कार्यालय सिंदखेडराजा येथे येथे भव्य मोर्चा काढून हे अर्ज रितसर सरकारला द्यायचे आहे .

तसेच आतापर्यंत 2023 रब्बी खरीप आणि 2024 खरीप ज्या शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला नाही किंवा कमी मिळाला आहे अशा शेतकऱ्यांनी दिनांक 5 मे रोजी उपविभागीय कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे तरी संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी या मोर्चात सामील व्हा असे आवाहन शेतकरी योद्धा कृती समितीने केली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या