बुलढाणा
*मायेची सावली – माणुसकीचा झरा….*
*देवानंद पवार फाऊंडेशनचा -सामाजिक उपक्रम”*
*निराधार शोभा आजीसह चार नातींना -बांधून दिले हक्काचे घर !..*
*भांड्यासह अन्नधान्य देऊन वर्षभराची केली आबादानी!*
*बोथा येथील आगळ्यावेगळ्या गृहप्रवेश चा सोहळा पार पडला….*
मायेची सावली देणारे या जगात फार कमी लोक आहेत मात्र काही प्रमाणात एखादा दानद ठेवणारा क्वचितच असतो …तो व्यक्ती जिल्ह्यात कृतीतून दिसून आला….त्या व्यक्तीच नाव देवानंद पवार असे आहे… पेशाने शिक्षक व त्यांची मुलगी माधुरी वकील…
देण्याची दानत लागते, अर्थात ती सर्वांकडेच नसतेही, तर दान देण्यासाठी आर्थिक परिस्थितीपेक्षा मानसिक स्थिती गरजेची असते हेही तितकेच खरे. मात्र देवानंद पवार व अॅड. माधुरी पवार हे बाप-लेक याला अपवाद ठरल्याचे दिसून आले. त्यांनी आपल्या देवानंद पवार मल्टीपर्पज फाउंडेशनच्या माध्यमातून मेहकर तालुक्यातील बोथा येथील ७५ वर्षीय निराधार शोभा भालेराव आजीसह चार नातींसाठी पदरमोड करून हक्काचे घर बांधून दिले. एवढेच नव्हे तर त्यांना भांडीकुंडी व वर्षभर पुरेल एवढे अन्नधान्यही घेऊन दिले. या घराचा गृहप्रवेश सोहळा तालुक्यातील बोथा या दुर्गम गावी थाटामाटात पार पाडला. याप्रसंगी उपस्थितांच्या डोळ्यातून आपसूकच आश्रू तरळतांना दिसले.
मेहकर तालुक्यातील देऊळगाव साखरशा ते मेहकर रोडवरील सिध्दांता आश्रमपासून दोन किलोमीटर अंतरावरील आडवळणावर असलेले बोथा हे तस दुर्गम गांव. याच गावात ७५ वर्षीय निराधार शोभा भालेराव आजी आपल्या चिमुकल्या चार नातीसह राहतात.
आठरा विश्व् दारिद्र्य पिच्छा सोडायला तयार नसतानाच, नातींचे मातृपितृक्षत्रही हरवलेले. त्यामुळे ७५ वर्षीय शोभा भालेराव आजी छातीचा कोट करून परिस्थितीशी चार हात करतेय व स्वतःसह नातींचे पालनपोषण करते.
याबाबत येथील संवेदनशील शिक्षक अमित शिंगणे यांना माहिती झाली. त्यांनी या कुटुंबाशी संपर्क साधत तब्बल तीन वर्षापासून कोणत्या ना कोणत्या प्रकारे या कुटुंबाच्या मदतीसाठी हात पुढे ठेवला.
शोभा आजीला घरकुल मिळाले होते, परंतु धो धो पावसात ते वाहून गेल्याने त्या दहा बाय दहाच्या छोट्या पडक्या घरात वास्तव्य करीत होत्या, असे शिक्षक अमित शिंगणे यांनी सांगितले.
याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते देवानंद पवार व देवानंद पवार फाउंडेशनच्या अध्यक्षा अॅड. माधुरीताई पवार यांना मिळताच, अॅड. माधुरी पवार यांनी शिक्षक अमित शिंगणे यांच्यासह या निराधार कुटुंबाची भेट घेतली. तातडीने सूत्र हलवत त्यांनी आठ दिवसांत टिन शेडच्या टुमदार दोन खोल्या त्यांना बांधून दिल्या, एवढेच नव्हे तर त्यांना वर्षभर पुरेल एवढे अन्नधान्य, यासोबतच गादी, पलंग, पंखा, आरसा, कंगवा यास नित्यपयोगी सर्वच साहित्यदेखील घेऊन दिले. या नवीन घरात त्या चार अनाथ मुलीच्या वडिलांचा व आजोबाचा फोटो लावण्यात आला त्यावेळी थोडी समज असलेल्या चार मुली पैकी मोठी मुलगी ज्योती हिच्या डोळ्यात टचकन पाणी आल व त्यावेळी मन भरून आल..
या घराचा गृहप्रवेश सोहळा परवा बोथा येथे थाटामाटात पार पडला. यावेळी आमदार सिद्धार्थ खरात यांनी या उपक्रमाचे कौतुक करत, या भालेराव कुटुंबाला शासनस्तरावरून काय मदत करता येईल, याबाबत संबंधितांची बोलतो असे सांगताना त्यांनादेखील गहिवरून आले. यावेळी प्रदेश काँग्रेस सरचिटणीस श्याम उमाळकर, माजी सभापती नंदकिशोर बोरे, ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव घुमरे, आशीष राहाटे यांनी मार्गदर्शनातून देवानंद पवार व अॅड. माधुरी पवार यांच्या सामाजिक उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले. प्रास्ताविकातून अॅड. माधुरी पवार यांनी शोभा भालेराव कूटूंबाच्या व्यथा सांगून, देवानंद पवार फाऊंडेशनने यासाठी खारीचा वाटा उचलला असून, पुढे या चार चिमुकल्याना शिक्षण देण्याचा माणसं बोलून दाखवीला… गावात फक्त 4 थी पर्यंत शाळा आहे या चार मधील मोठी मुलगी ज्योती ही आता पाचव्या वर्गात शिक्षण घेत आहे… पुढील शिक्षण देण्यात असल्याच माधुरी पवार यांनी सांगितले.. आणखीही मदतीचे हात पुढे यावे, असे आवाहन केले….