*रूढी परंपरेला, अंधश्रद्धेला फाटा देत. चौथ्या दिवशी रक्षाविसर्जन करून, सर्व विधी करून, वृक्षारोपण केले.*
*भानुसे परिवाराने घालून दिला नवा आदर्श.*
*डॉ.शिवानंद भानुसे यांनी घेतला पुढाकार*
*विझोरा*: बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील विझोरा येथील प्रतिष्ठित नागरिक माजी सरपंच नारायणराव भानुसे यांचे वडील तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांचे आजोबा सखाराम पांडुरंग भानुसे यांचे ४ मे २०२५ रोजी ९२ व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांचा अंत्यविधी अत्यंत साध्या पद्धतीने जिजाऊ वंदना सादर करून केला. त्यानंतर चौथ्या दिवशी ७ मे २०२५ रोजी रक्षाविसर्जनासह सर्व विधी पूर्ण करून, पाच झाडे लावून, वृक्षारोपण करून. गोडजेवण करून, चौथ्या दिवशीच सर्व विधी संपन्न केले. रूढी परंपरेला व अंधश्रद्धेला, फाटा देत भानुसे कुटुंबियांनी नवा आदर्श घालून दिला आहे. कारण जुन्या परंपरेप्रमाणे १३, १४ दिवस सर्व भाऊबंद, सगळे सगेसोयरे अडकून पडत होते. अनेक ठिकाणी लग्न व इतर कार्य सर्व खर्च करून स्थगित करावे लागत होते. त्यामुळे अनेक जण अडचणीत येत होते. हे योग्य नव्हते. त्यामुळे चौथ्या दिवशीच हे केलं पाहिजे. असे विचार मराठा सेवा संघाचे पुरोगामी विचार ज्यांनी अंगीकारले असे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते डॉ.शिवानंद भानुसे यांनी सर्वांसमोर मांडले. आणि त्यांचे वडील, आई, काका, काकू आणि सर्वांनीच त्यांना दुजोरा दिला. त्यामुळे अशा प्रकारचा सर्वांना सोयीचा अत्याधुनिक असा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला. डॉ.शिवानंद भानुसे याप्रसंगी म्हणाले की जोपर्यंत व्यक्ती जिवंत आहे. तोपर्यंत त्यांची पुरेपूर काळजी घेतली पाहिजे. त्यांना प्रेम दिले पाहिजे. तेच महत्त्वाचे आहे. व्यक्ती गेल्यानंतर फार काही महत्त्वाचं नसतं. त्यामुळे जिवंतणीच काळजी घेतली पाहिजे. आणि गेल्यानंतर लोकांना अडचणीत आणण्यापेक्षा तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशीच हे सर्व विधी आपण पूर्ण करून त्यांची आठवण म्हणून वृक्षारोपण केले पाहिजे. असे डॉ. शिवानंद भानुसे यांनी सांगितले. या समारंभाला मोठ्या प्रमाणात पंचक्रोशीतील व संपूर्ण महाराष्ट्रातील देशभरातील मोठा समुदाय उपस्थित होता.