हाच का लोणार नगरपरिषदेचा सुवर्णकाळ?
डॉ. गोपाल बछिरे यांचा प्रशासनाला सवाल
लोणार
सुवर्णकाल पूर्णं केलेल्या लोणार नगरपरिषकेला पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने पर्यटन दृष्टिकोनातून ‘अ’ दर्जा प्राप्त असलेल्या लोणार शहर विकासाची चाके थांबली आहेत. पाणी, स्वच्छता, आरोग्य, विकास हे सर्व प्रशासनातील बेफिकीरी, बेजबाबदार आणि नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे लोणारचे नागरिक त्रस्त झाले आहेत आणि म्हणून उद्धवसेनेने आक्रमक पवित्रा घेत मुख्याधिकान्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले व हाच का तो लोणार नगर परिषदेचा सुवर्णकाळ असा प्रश्न डॉ. गोपाल बछिरे यांनी उपस्थित केला.
लोणार नगर परिषदेची परिस्थिती, नळाला महिन्यातून एकदा येणार विनाशुद्धीकरण, घाण व दुर्गंधीयुक्त पाणी, त्यामुळे सर्वसामान्यांच्या आरोग्यावर होणारी दुष्परिणाम, शहरातील सर्वच प्रभागांमध्ये अस्वच्छता, रखडलेली विकासकामे आणि अर्धवट टाकलेले प्रकल्प यामुळे नागरिकांना विनाकारण मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. नगर परिषद कार्यालयात कुठलेही काम घेऊन गेले की, संबंधित अधिकारी ‘मैदानी दौर्यावर आहेत”‘ असे सांगण्यात येते, म्हणून शिवसेना उबाठाचे जिल्हा संघटक डॉ गोपाल बछिरे तालुकाप्रमुख ॲड. दीपक मापारी शहर प्रमुख गजानन जाधव शहरसंघटक तानाजी मापारी, ज्येष्ठ शिवसैनिक सुदन अंभोरे, शहर उपप्रमुख लूकमान कुरेशी, युवा शहर प्रमुख श्रीकांत मादनकर, अशपाक खान व नागरिकांनी कार्यालयात ठिय्या देत आंदोलन केले व हाच का लोणार नगर परिषदेचा सुवर्णकाळ असा प्रश्न उपस्थित केला.
शहरातील महत्त्वकांक्षी कोराडी पेयजल पाणीपुरवठा योजना गेली दोन वर्षे अपूर्ण आहे. या योजनेच्या अंदाजपत्रकात मार्च महिन्यात पूर्ण होणार असल्याचे नमूद करण्यात आले होते; मात्र, प्रत्यक्षात काम अतिशय संथगतीने सुरू आहे. स्थानिक प्रशासन या योजनेकडे
गंभीरतेने पाहताना दिसत नाही. मुख्याधिकारी वारंवार दहा, दहा बारा, बारा दिवस कार्यालयात अनुपस्थित असतात व तेथील कर्मचारी यांना विचारले असता प्रत्येक वेळा “मॅडम दौऱ्यावर असल्याचे कारण देत असतात”. प्रश्न हा उपस्थित होतो मुख्यअधिकारी मॅडम ह्या लोणार नगरपरिषदेच्या सिओ आहेत की दुसऱ्या जिल्ह्याच्या? त्यांचे कार्यक्षेत्र ही लोणार नगरपरिषद आहे की दुसरा जिल्हा? त्यांच्या अनुपस्थितीमुळे नगरपरिषदेच्या इतर विभाग प्रमुखांवर कुणाचा धाक उरलेला नाही. परिणामी, नगर परिषदेचे विकासकामे शहराची स्वच्छता, शहराचा पाणीपुरठा ,शहराचे आरोग्य हे सर्व धोक्यात आले आहे करिता जिल्हाधिकान्यांनी लक्ष घालण्याची गरज असल्याचे जनतेतून बोलले जात आहे व या परिस्थितीवर तोडगा एकच की विद्यमान मुख्य अधिकाऱ्यांना त्यांची वैयक्तिक काम करण्यासाठी कायमचे कार्यमुक्त करावे व दुसरे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी यांची नेमणूक लोणार नगरपरिषदेवर करावी या करिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछीरे तालुकाप्रमुख ॲड. दीपक मापारी शहर प्रमुख गजानन जाधव शहरसंघटक तानाजी मापारी, ज्येष्ठ शिवसैनिक सुदन अंभोरे, विभागप्रमुख गोपाल मापारी, तानाजी अंभोरे, युवा शहर प्रमुख श्रीकांत मादनकर व आदी शिवसैनिक माननीय जिल्हाधिकारी किरण पाटील साहेब यांच्याकडे साकडे घालनार असल्याचे जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे यांनी सांगितले