18.8 C
New York
Saturday, June 14, 2025

Buy now

spot_img

मोताळ्यात लवकरच घडणार जलक्रांती राहेरा धरण पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यात; आमदार संजय गायकवाड यांनी केली कामांची पाहणी

मोताळ्यात लवकरच घडणार जलक्रांती
राहेरा धरण पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यात; आमदार संजय गायकवाड यांनी केली कामांची पाहणी
प्रतिनिधी | मोताळा

मोताळा तालुक्यातील पाण्याच्या टंचाईवर कायमस्वरूपी उपाय म्हणून उभारण्यात येणारे राहेरा येथील धरण आता अंतिम टप्प्यात पोहोचले असून लवकरच हे प्रकल्प पूर्णत्वास येणार आहे. या धरणामुळे तालुक्यात जलक्रांती घडणार असून  अनेक गावांमध्ये शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाण्याचा मोठा प्रश्न सुटणार आहे. या पार्श्वभूमीवर बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी नुकतीच धरण स्थळी पाहणी करून कामांची माहिती घेतली.

त्यांनी अभियंत्यांसोबत चर्चा करत कामाच्या दर्जाबाबत समाधान व्यक्त केले व उर्वरित काम तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश दिले.धरण पूर्ण झाल्यानंतर राहेरा परिसरासह आसपासच्या गावांतील शेतकऱ्यांना जलसिंचनासाठी भरपूर पाणी उपलब्ध होणार आहे. यामुळे तालुक्यातील शेती समृद्ध होणार असून पाण्यावर अवलंबून असलेले अर्थकारण देखील बळकट होईल. राहेरा येथे २००८ पासून धरणाचे ४०% काम हे ८ वर्ष सुरू होते परंतु हा प्रकल्प निधी अभावी रखडून पडला होता मागील दोन वर्षापासून बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर संजुभाऊ गायकवाड यांच्या कार्यतत्परतेमुळे तसेच नियोजनामुळे धरणाचे उर्वरित ७० टक्के कामाकरिता २५ कोटी रुपये निधी उपलब्ध करून देऊन अत्यंत जलद गतीने मागील ४ महिन्यांमध्ये धरणाचे उर्वरित ८०% काम अंतिम टप्प्यात पूर्ण करून धरणाची धार दाबण्यात आलेली आहे, यामुळे आजूबाजूची १२०० एकर जमीन ओलिताखाली येणार आहे, यावेळी उपसासिंचन योजनेकरिता देखील २० कोटी रुपये धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांनी मंजूर करून घेतले तसेच कोर्टाने आदेश दिल्यामुळे बुडीत क्षेत्रातील जे शेतकरी प्रकल्पग्रस्त होते ज्यांचा या प्रकल्पाला विरोध होता त्यांच्या पुनर्वसनासाठी देखील आमदार साहेबांच्या प्रयत्नामुळे  वाढीव ४८ कोटी रुपये निधी तसेच सरळ खरेदी झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ०५ लाख रुपये असे एकूण १ कोटी २१  लक्ष त्यामुळे जवळपास धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांच्या प्रयत्नाने एकूण ११० कोटी रुपये आमदार झाल्यापासून मंजूर करून आणून हा प्रकल्प पूर्णत्वास नेला…!यामध्ये गावातील पुनर्वसनाची सर्व कामे जसे की रस्ते, नाल्या, संरक्षणभिंत, शाळा याकरता देखील धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांनी १० कोटी रुपयांचा भरीव निधी उपलब्ध करून दिला आणि पाणीपुरवठ्याच्या विहिरीसाठी देखील निधी उपलब्ध करून दिला…!  या सर्व प्रकल्पामुळे आजूबाजूच्या सर्व डाभा,गुळभेली,राहेरा, खामखेड यासह बाराशे हेक्टर जमीन ही सिंचनाखाली येऊन खऱ्या अर्थाने मोताळा तालुक्यामध्ये हरितक्रांतीची सुरुवात होऊन शेतकऱ्याचे आयुष्य सुखी आणि समृद्ध होणार आहे….!
यावेळी त्या ठिकाणी संबंधित कॉन्ट्रॅक्टरने लवकरात-लवकर काम पूर्णत्वास आणल्याबद्दल धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांनी त्यांचे देखील अभिनंदन केले…!
यावेळी त्या ठिकाणी शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी,शिवसैनिक, पाटबंधारे विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी,संबंधित शासकीय कंत्राटदार तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते…!

Related Articles

ताज्या बातम्या