*शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या संकल्पनेतून साजरा झाला सामाजिक भान जपणारा गणेशोत्सव…….
गणपती बाप्पांना साश्रूनयनांनी भावपूर्ण निरोप – संघर्षशील व्यक्तींचा दररोज सन्मान*
बुलडाणा,
क्रांतिकारी गणेशोत्सव मंडळाचा विसर्जन सोहळा आज उत्साहात पार पडला. गणरायाच्या आरत्या, डफडे व डि जे चा गजर आणि भावनिक वातावरणात गणपती बाप्पांना साश्रूनयनांनी निरोप देण्यात आला.

मंडळाचे अध्यक्ष शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी यंदा सामाजिक भान जपत आगळावेगळा उत्सव साजरा केला. सौ. शर्वरीताई तुपकर यांच्या संकल्पनेतून उभारलेला शेतकरी आंदोलनाचा देखावा समाजमाध्यमांवर विशेष गाजला.
दररोजच्या आरतीचा मान समाजातील वंचित व संघर्षशील व्यक्तींना देण्यात आला. यात दत्तक कन्या, शहीद जवानांच्या पत्नी, एमबीबीएससाठी मुलाला शिकवणारा पंक्चर कामगार, सलून व्यवसायातून पत्नीला शिक्षण देऊन नोकरीत रुजू करणारा व्यक्ती, दुध उत्पादक शेतकरी, रिक्षा चालवणारी महिला, विशेष सेवा पदकप्राप्त पोलिस कॉन्स्टेबल, नर्सेस तसेच सेवानिवृत्त सैनिकांचा समावेश होता. प्रत्येक आरतीतून संघर्ष, कर्तृत्व आणि प्रेरणा यांचा गौरव झाला.
लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची परंपरा सुरू करताना सामाजिक बांधिलकी, लोकजागृती आणि एकोप्याचा संदेश देण्याचा विचार मांडला होता. यंदाच्या क्रांतिकारी गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमातून हाच संदेश प्रत्यक्षात साकार झाल्याची भावना जनमानसात उमटली आहे, अशी चर्चा परिसरात रंगली आहे.

यावेळी तरूणांनी विशेष गर्दी केली होती. परिसरातील नागरिक व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. डफड्यांच्या तालावर रविकांत तुपकर यांच्या परीवारातील सर्वांनी. चौकट डान्स केला . यावेळी महीला भगीनी पण थिरकल्या रविकांत तुपकर व सौ शर्वरीताई तुपकर यांनी फुगडी खेळत आनंद द्विगुणित केला. विसर्जना वेळी गणपती बाप्पां चं ट्रैक्टर चालवत रविकांत तुपकर यांनी स्वतः सारथ्य केले गणपती विसर्जनाच्या वेळी वाजत-गाजत, डफडे व डि जे च्या गजरात भावपूर्ण वातावरणात बाप्पांना निरोप देण्यात आला. पैनगंगा नदी मध्ये बाप्पांचं विसर्जन केले गेले.उत्साह आणि ओढीबरोबरच डोळ्यांत पाणी आणणारा हा निरोपाचा क्षण सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला.गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या या घोषणांनी आसमंत दणाणून गेला
यावेळी रविकांत तुपकर यांनी गणपती बाप्पां ना प्रार्थना केली की शेतकऱ्यांना कर्जमुक्ती ची सद्बुद्धी सरकारला होऊ दे शेतकरी सुखी समृद्ध व प्रगत होऊ दे . शेतमालाला योग्य भाव मिळुन शेतकऱ्यांच्या कष्टाचं चीज होऊदे
हा गणेशोत्सव केवळ धार्मिक विधींच्या चौकटीत न राहता समाजातील वंचित व प्रेरणादायी घटकांना गौरवणारा, समाजजीवनाला नवीन दिशा दाखवणारा आणि संघर्षातून प्रेरणा देणारा ठरल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

