- शेतकरी योद्धा कृती समितीच्या वतीने कृषीमंत्र्यांना बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा त्वरित द्या असे निवेदनाद्वारे साकडं घातले
आमच्या बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा २३/२४ खरीप व रब्बी हंगामातील ८० % पीक विमा बाकी आहे हे पोट तिडकीने कृषिमंत्र्यापुढे मांडले
निवेदन दिल्यानंतर कृषिमंत्र्यांनी आज दिनांक ४/६/२०२५ च्या बैठकीमध्ये हा विषय मार्गी लावायचा असे आश्वासन शेतकरी योद्धा बालाजी सोसे गजानन जायभाये शेतकरी मित्र गजानन सोनुने यांना आश्वासन दिले असून संबंधित निवेदन तात्काळ आजच्या बैठकीमध्ये हा विषय मार्गी लावायचा असे आदेश कृषिमंत्री माणिकदादा कोकाटे यांनी त्यांच्या संबंधित विभागाला दिले आहे आज कृषिमंत्री श्री माणिक दादा कोकाटे यांना निवेदन देण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातून शेतकरी योद्धा कृती समितीची जी टीम आली होती दिनांक ४ जूनला सकाळी १० वाजेपासून पोलीस संरक्षणाच्या निगराणीखाली पोलिसांनी ताब्यात घेऊन संबंधित सर्व शेतकऱ्यांना कृषी मंत्री माणिकदादा कोकाटे यांच्या भेटीसाठी स्वतः मंत्रालयामध्ये पाच ते सहा पोलीस कर्मचारी यांच्या निगराणीखाली यांच्या बंदोबस्तामध्ये कृषी मंत्र्यांची भेट घडून आणली आणि कृषीमंत्र्यांनी सांगितले की आजच्या बैठकीमध्ये पीक विम्याच्या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतल्या जाणार आहे असे आश्वासन दिले
शेतकरी योद्धा कृती समिती बुलढाणा जिल्हा.