18.8 C
New York
Saturday, June 14, 2025

Buy now

spot_img

बुलढाणा ब्रेकिंग जिल्हा परिषद सी ई ओ ने केलेली कारवाई योग्यच.. पालकांच्या प्रतिक्रिया राज्यातील शिक्षण विभागातील सर्वात मोठी कारवाई.. *35 शिक्षकांना निलंबीत तर 60 शिक्षकांना कारणे दाखवा नोटीसा..* जिल्ह्यातील 50 टक्के शिक्षक जिल्हा परिषद कार्याल्यात व तालुक्यातील पंचायत समितीत फिरताना दिसत होते..

बुलढाणा ब्रेकिंग

जिल्हा परिषद सी ई ओ ने केलेली कारवाई योग्यच.. पालकांच्या प्रतिक्रिया

राज्यातील शिक्षण विभागातील सर्वात मोठी कारवाई..

*35 शिक्षकांना निलंबीत तर 60 शिक्षकांना कारणे दाखवा नोटीसा..*

जिल्ह्यातील 50 टक्के शिक्षक जिल्हा परिषद कार्याल्यात व तालुक्यातील पंचायत समितीत फिरताना दिसत होते..

अंकर
राज्यात शिक्षणाचा दर्जा अत्यंत खालावला असून याला सर्वस्वी जबाबदार हे शिक्षक असल्याच समोर आलाय… जिल्हा परिषद शाळेतील काही शिक्षक फक्त टाईम पास नोकऱ्या करताना दिसत आहेत.. शासणाचा गडगंज पगार घेत शिक्षणाचा बट्ट्याबोल केल्याचे चित्र आहे… बुलढाणा जिल्ह्यातील काही शिक्षकांनी शाळेतील पटसंख्या घटवली असल्याचे चित्र पुढे आल्याने जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी गुलाबरावं खरात यांनी कडक कारवाई करत दोषी शिक्षकाना निलंबीत केले आहे, तब्ब्ल 35 शिक्षक निलंबीत करीत 60 शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत..
35 शिक्षकांना एकाच वेळेस निलंबीत करण्याची राज्यातील पाहिलीच घटना म्हटली जात आहे.. या धडक कारवाईने शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे..
जिल्ह्यात 8 हजार शिकधक कार्यरत आहेत.. त्यापैकी 30, 35 टक्के शिक्षक फक्त जिल्हा परिषद कार्यालयात उगीचच फिरताना दिसत होते, शाळा व विद्यार्थी वाऱ्यावर सोडून शिक्षक जिल्हा परिषद कार्यालयात फिरताना दिसतात.. त्यामुळे विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी झाली आहे.. 3 विद्यार्थी व 2 शिक्षक , प्रत्येक शिक्षकाला लाख रुपये पगार 2 लाख दोन शिक्षकांना पगार देऊन फक्त तीन विद्यार्थ्यांना शिकवण्याची वेल आली आहे , कित्येक वेळा शिक्षणाधिकारी व सिओ यांनी जिल्हतातील शिक्षकांचे प्रशिक्षण घेऊन पटसंख्या वाढविण्याचे सांगितले होते मात्र शिक्षकांनी त्या प्रशिक्षणाला कचरापेटी समजली आता सिओ यांनी धडक कारवाई करीत 35 शिक्षकांना निलंबीत केले आहे..
ही कारवाई योग्य असल्याचे पालकांनी बोलून दाखविले असून अश्या शिक्षकांना बडतर्फ करण्याची मागणी पालकांनी व शिक्षण समित्यानी केली आहे.. जिल्हा परिषद शाळेत गोर गरिबांचज विद्यार्थी शिक्षण घेतात मात्र त्यांना योग्य शिक्षण मिळत नसल्याने शिक्षणाचा दर्जा खाली घसरला असल्याने पालकवर्गात चिंता वाढली आहे.. त्यामुळे शिक्षणात कुचराई करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.. सिओ गुलाबराव खरात यांनी केलेल्या कारवाईचे सर्वस्तरातून कौतुक केल्या जात आहे…तसेच जिल्हा परिषद व तालुक्याच्या पंचायती समिती कार्याल्यात फिरणाऱ्यांवर सुद्धा कारवाई जरण्यात यावी अशी नागणी पालक वर्गानी सिओ यांच्याकडे केली आहे..

Related Articles

ताज्या बातम्या